Home Search

सण - search results

If you're not happy with the results, please do another search

मुलांचे वाचन – एक विचार (Natural Learning a thought)

3
मुलांचे वाचन म्हणजे अर्थातच त्यांची वाचायला शिकण्याची प्रक्रिया. या विषयावर बोलायला सुरुवात अगदी प्राथमिक पातळीवरून करूया. वय वर्षे तीन ते सहा ह्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणाला बालशिक्षण असे म्हणतात. ह्यालाच 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षण असे म्हटले आहे. ह्या पायाभूत शिक्षणाचे किंवा बालशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे...

गल्लीतली दिवाळी सुट्टी (Diwali Vacation in Good Old Days!)

आमची गल्ली म्हणजे राजारामपुरी अकरावी गल्ली, कोल्हापूर. आमच्या लहानपणी आम्ही या गल्लीत राहत असू. सहामाही परीक्षा संपली की शाळेला दिवाळीची सुट्टी लागायची. त्यावेळच्या दिवाळी सुट्टीचे, दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची सुट्टी असे सरळ सरळ दोन भाग करता येत. त्या काळातल्या आठवणींनी डोळे क्षणभर पाणावतात. केवळ क्षणभरच... आजच्या सुट्टीतली मजा विकत घेतलेली असली तरी... सोयीची आहे... कालसुसंगत आहे... हे जाणवत राहतं...

जोर्वे-नेवासे संस्कृती (Jorve-Newase Civilization)

महाराष्ट्रा तल्या आद्य मानवी वसाहतींची संस्कृवती 'जोर्वे-नेवासे' संस्कृेती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर...

ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...

वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...

माझं प्राणिविश्व (My world of Animals)

1
माणूस ज्या प्राण्यांचा सांभाळ करतो, ज्या पद्धतीने त्यांच्यावर प्रेम करतो, त्याच्या कितीतरी अधिक पटीने ते प्राणी कोणत्याही बंधनांशिवाय माणसावर प्रेम करतात. माणसाच्या सद्भावाचा तो एक विशेष घटक आहे. कुत्रा हा प्राणी त्याच्या स्वतःपेक्षा कित्येक पटींनी त्याची काळजी घेणाऱ्यावर प्रेम करतो. मांजरा-कुत्र्यांच्या माणसाबरोबर असण्याने आपलेपणा, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा, काळजी या भावना जागृत होतात. पुण्यातील संस्कृत भाषेच्या अभ्यासक सरोजा भाटे यांचा त्यांच्या लहानपणापासून आत्तापर्यंत किती वेगवेगळ्या प्राण्यांशी संबध आला आणि ते त्यांच्या आयुष्यात कसे आपलेसे झाले याबद्दल लिहिलेला हा लेख...

कथा ग्लासफर्डपेठा गावाची (Story of Glasfardppeta)

2
भारत देशात अशी काही गावे आहेत जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावरून ओळखली जातात. त्या गावांशी निगडित कथा तितक्याच सुरस व रंजक आहेत. ‘ग्लासफर्ड’ हा मूळ स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ असा होतो. ते गाव प्राणहिता नदीच्या तीरावरील घनदाट जंगलात आहे. इंग्रजी सत्तेच्या काळात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून त्या गावास नवे नाव मिळाले. त्या अधिकाऱ्याचे पूर्ण नाव होते - चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन ग्लासफर्ड. त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ग्लासफर्डचे नाव विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृती यांच्या आद्य अभ्यासकांमध्ये घेतले जाते...

अर्थांनो ! मागुते या !

शब्द आणि अर्थ ही जोडी तशी अतूट. पण कधी कधी दोघेही एकमेकांना हुलकावणी देत राहतात. मग कधीतरी कवीला शब्दांना साद घालावी लागते. म्हणून केशवसुत यांनी शब्दांना मागुते म्हणजे मागोमाग येण्याचे आवाहन केले. त्यांनी मनातल्या संवेदनांना आकार द्यावा, म्हणून शब्दांची विनवणी केली. तर विंदा करंदीकरांना मनातले अर्थ चिमटीत पकडायला, त्यांना आकार द्यायला शब्द अपुरे पडताहेत, असे जाणवले आणि ते लिहून गेले...

लाडूच लाडू -विचित्र नावांचे स्वादिष्ट लाडू (Laddus with Strange Names)

किती चित्रविचित्र नावांचे लाडू या जगात आहेत याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. उदाहरणार्थ, ‘खडखडे लाडू’. मालवण पट्टयात मिळणाऱ्या कडक बुंदीच्या लाडवांना खडखडे लाडू म्हणतात. तेथील लाडू जाड शेवेचे, काजूचे आणि खडखडे लाडू खडखड करत पोराबाळांनी खावेत किंवा दात पडलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी वेळ जावा म्हणून चघळत बसावेत किंवा डब्यात खडखड वाजत असावेत म्हणून खडखडे. बेळगावकर सारस्वत लोकांच्या दिवाळीत ‘लडगी लाडू’ असतात. ‘खूळे लाडू’ नावाचे लाडू बेळगाव ते संकेश्वर भागात गणपती विसर्जनाच्या वेळी बनवतात...

मार्सेलिसची मासीया – रशियन तरुणीचे भारतप्रेम (Massia Bibikoff’s book on an Indian in first...

0
मार्सेलिस हे फ्रान्सच्या किनाऱ्यावरील बंदर म्हणजे सावरकरभक्तांचे तीर्थस्थान आहे. सावरकर यांनी 1910 साली त्याच ठिकाणी समुद्रात उडी घेतली आणि ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. त्या मार्सेलिसमध्ये, सावरकर यांच्या उडीनंतर चारेक वर्षांनी रशियन रेखाटनकार आणि भारतीय संस्थानिक यांच्या मैत्रीची कथा आश्चर्यजनक अशी जन्मली व फुलली. ती कथा शब्दांत तर मांडली गेलीच, पण त्याहीपेक्षा ती चित्रांतून- रेखाचित्रांतून व्यक्त झाली. ते स्वाभाविकपणे घडून आले...

मीर लायक अली फरार ! – सन 1950

4
भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, तेव्हा हैदराबादच्या निजामाने हैदराबाद संस्थान हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. त्या वेळी मीर लायक अली हा निजामाचा पंतप्रधान होता. भारतात सामील न होण्याचा सल्ला निजामाला देणाऱ्यांमध्ये त्याचे नाव अग्रेसर होते. मीर लायक अली हैदराबाद संस्थानात यशस्वी उद्योगपती होता. भारताने ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईस आरंभ केल्यानंतर निजामाने राज्यात झालेल्या अत्याचारांची आणि पर्यायी युद्धाची सर्व जबाबदारी मीर लायक अली आणि त्याचे मंत्रिमंडळ यांच्यावर टाकली आणि स्वतः नामानिराळा झाला. भारताने मीर लायक अली याला नजरकैदेत टाकले. परंतु तो नजरकैदेतून पसार 1950 मध्ये झाला...