Home Search
वाचन - search results
If you're not happy with the results, please do another search
अभिवाचन – नवे माध्यम!
महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे वृत्तांत, बातम्या वर्तमानपत्रांतून अधुनमधून प्रसिद्धही होतात. अभिवाचनात प्रामुख्याने कविता आणि कथा यांचा समावेश असतो. काही ठिकाणी स्वरचित...
वाचनालयाचे स्वप्न!
गाव शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर . तीस वर्षांपूर्वी, गावची लोकवस्ती पाच-सहा हजार असावी. मी सहावी-सातवीत असेन. गावात मारुतीच्या देवळात राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय होते....
अक्षय वाचनाचा वसा
वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे...
स्वभाषा : संस्कृती व समाज यांच्यासाठी गरजेची ! (Society, it’s culture and the language)
मी माझा धाकटा मुलगा रघुराज याच्याकडे सिडनीला आलो आहे. मुलाची बायको - बीॲट्रिस ही मलेशियन-चायनीज-ऑस्ट्रेलियन आहे. म्हणजे तिचा जन्म मलेशियात झाला. ती दहा वर्षांची असताना लिंम कुटुंब, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ऑस्ट्रेलियात 1980 च्या सुमारास आले. हल्ली बऱ्याचशा मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकी एक तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यांतील काही जणांनी परदेशी मुलींशी लग्ने केली आहेत. तेव्हा भाषा टिकवायची कशी? हा मोठा प्रश्न आहेच...
गौडमल्हार म्हणजे प्रेमाचा पाऊस ! (Classical Gaud Malhar Is Full of Love !)
गौडमल्हारचा परिचय तसा उशिराच झाला ; पण पहिल्या श्रवणापासून जिवाभावाचा बनलेला तो खास आवडता राग ! किशोरी यांची स्वरचित ‘बरखा बैरी भयो’ ही रचना माझ्या सर्वाधिक प्रिय रचनांपैकी एक ! त्यातील ‘जाने ना देत मोहे पी की नगरिया’ या ओळीतील भाव थेट हृदयाला भिडणारा आहे. त्यामधून प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील असा क्षण आठवेल, की प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकली नाही याची हुरहूर मनाला लागून राहील. भावनांचे किती असे नाजूक पदर ...
विलास शिंदे यांची हाक, निसर्गासाठी ! (Vilas Shinde’s Efforts for Environment)
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे हे शैक्षणिक पात्रतेनुसार व्हायचे मातब्बर प्राध्यापक; परंतु वास्तवात ते शिरले विद्यापीठ प्रशासनात आणि झाले कुलसचिव. अर्थात, त्याआधी उप, प्रभारी अशी कुलसचिवपदे त्यांना निभावावी लागलीच. एका अर्थाने तेही बरे झाले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठास उत्तम, अनुभवी प्रशासक लाभला, विद्यापीठाच्या टेकडीवर निसर्गसृष्टी बहरली, विद्यापीठ हे पाण्याने मालेमाल झाले; तेवढेच नव्हे तर संकटसमयी विद्यापीठ साऱ्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवू लागले ! विलास शिंदे यांच्यात एकाच वेळी शिक्षणप्रेमी प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, हाडाचा निसर्गवेडा आणि लेखनकुशल विज्ञानप्रसारक अशी चार व्यक्तिमत्त्वे लपली आहेत. मात्र लोकांच्या लेखी ते ‘पाणीवाला बाबा’ किंवा इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या कविमनाच्या व्यक्तीस ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असतात...
जामनेर – बागायती आणि सुसंस्कृत (Jamner – city with rich development and cultural activities)
जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...
ग्रंथालये नव्हे, सांस्कृतिक केंद्रे ! (Book Libraries will be cultural Centers)
पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला...
बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज
बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे...
NOTA -None of the above एक परिणामशून्य निवडणूक साधन ? (NOTA needs to be...
भारतीय लोकशाही एका चिंताजनक वळणावर उभी आहे. लोकशाहीला दिशा देण्याचे कर्तव्य देशातील जनतेचे असते. त्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य मतदानाच्या अधिकाराच्या रूपात देशाच्या मतदारांमध्ये असते असे मानले जाते. देशातील राजकीय पक्षांचा, शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्थांचा निवडणुकांकडे पाहण्याचा सरंजामी दृष्टिकोन लक्षात घेऊन, योग्य उमेदवार उभे करण्याची आणि त्यांना निवडून आणण्याची क्षमता जनतेने गमावलेली असली तरी राजकीय पक्षांनी उभे केलेले अयोग्य उमेदवार नाकारण्याचा, त्याबद्दलची नाराजी व्यक्त करण्याचा, त्याद्वारे सरकारवर, राजकीय पक्षांवर आणि संबंधित व्यवस्थांवर दबाव निर्माण करून अंतिमतः निवडणूक पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणून ती परिणामकारक करण्याचा प्रयत्न होणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रियेमधील मतदान पत्रिका (बॅलट पेपर) आणि EVM मध्ये मतदारांसाठी NOTA म्हणजेच None of the above (वरीलपैकी कुणीही नाही) या पर्यायाचा समावेश करण्याचे आदेश 2013 मध्ये दिले ...