Home Search

लिपी - search results

If you're not happy with the results, please do another search

प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे

नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातील हा पहिला लेख...

बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील कागदपत्रांचा संग्रह (Ambedkar’s handwritten diaries and other material preserved in...

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहातील दुर्मीळ कागदपत्रे रासायनिक प्रक्रियेने सुरक्षित करून जतन करण्याची योजना सिद्धार्थ महाविद्यालयाने हाती घेतली आहे. त्यामध्ये बाबासाहेबांच्या टिपाटिप्पणी, नोंदी, प्रदीर्घ लेखन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे; बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील या टिपणी कशा कशाच्या असाव्यात ! ‘रिपब्लिक’ शब्दाच्या अर्थच्छेदापासून व्हायोलिन वाद्याची स्वरलिपी... एवढेच काय, पत्नीच्या बाळंतपणानिमित्ताने केलेल्या ‘मॅटर्निटी नोट्स’ असे विविध तऱ्हेचे साहित्य त्यात आहे. सिद्धार्थ कॉलेजला हे शक्य झाले ते श्रीपाद हळबे या अर्थ व विधी क्षेत्रातील व्यावसायिकाने दिलेल्या देणगीमुळे...

महेश लाडणे : नाणीसंग्रह; अभ्यास अभी बाकी है !

शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावच्या महेश लाडणे याच्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. तो इयत्ता नववीत शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. तो ते साहित्य जमवत गेला. त्यातून त्याचा नाणेसंग्रह आकारास आला. त्याच्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत...

वज्रलेखा सुनिता (Sunita a woman of fortitude!)

मैत्रबन हे आमचे शेतघर. त्याला आम्ही ‘फार्महाऊस’ म्हणत नाही. ती वास्तू म्हणजे पाठीमागे गर्द झाडीचा डोंगर, शेजारी जंगल, पुढे धरण अशा वेगळ्या धाटणीची आणि व्यक्तिमत्त्वाची आहे. ‘मित्रांनी मित्रांसाठी’ असे त्या वास्तूचे बोधवाक्य आहे. या आमच्या घरी सुनिता मदतीला आली आणि आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली ! आई नसलेली, लवकर लग्न झालेली, अकाली नवरा गेला अशी अनेक संकटे सोसलेली सुनिता...

कोलटकरांच्या भिजकी वहीची नवी आवृत्ती

अरुण कोलटकर यांच्या ‘भिजकी वही’ या कवितासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन 20 डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईतील गोरेगाव येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मध्ये रसिकांच्या गर्दीत झाले. ज्ञानपीठ सन्मानित भालचंद्र नेमाडे आणि ‘प्रास’चे जनक अशोक शहाणे हे दोघे प्रमुख पाहुणे होते. रेखा शहाणे आणि अंबरीश मिश्र यांचे नियोजन नेटके व प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते...

फलटणचे श्रीराम मंदिर

फलटणचे श्रीराम मंदिर जब्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला आहे. ते मंदिर सगुणाबाई निंबाळकर यांनी शके 1696 मध्ये बांधले. मुख्य मंदिरापुढील लाकडी मंडपाचे बांधकाम मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शके 1797 मध्ये केले. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडप अशी आहे...

मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी

1
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...

बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता व विविध कामगिरी

जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात. प्रबोधनाचे ते त्यांचे कार्य थोर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात पत्रकारिता, शिक्षण, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान, सामाजिक व धार्मिक जागृती व सुधारणा, शालेय पाठ्यपुस्तके, गद्य-पद्य इत्यादी क्षेत्रांत महत्तम कार्य केले आहे...

गुणाकर मुळे- शिंदी ते दिल्ली

0
अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक या गावी जन्मलेले आणि गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले गुणाकर मुळे यांनी विज्ञान लेखन साहित्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी मराठी भाषिक असूनही दिल्लीत हिंदी आणि इंग्रजीतून लेखन केले आहे...

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...