Home Search
लष्कर - search results
If you're not happy with the results, please do another search
वऱ्हाडची राजधानी अचलपूर
अचलपूर ही वऱ्हाडची जुनी राजधानी. त्या परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एलिचपूर हे त्याचे जुने नाव. त्या गावाला लष्करी डावपेचाच्या दृष्टीने इतिहासात फार महत्त्व होते. भारताच्या उत्तरेतून दक्षिण प्रदेशात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वारच ते ! बराणीने अचलपूरचा भारताच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे शहर म्हणून तेराव्या शतकात उल्लेख केलेला आहे...
बालंबिका देवीचे बालमटाकळी
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...
‘नाटो’ बरखास्त करणे हाच उपाय
नाटो म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ या संघटनेची स्थापना 1949 साली झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या या संघटनेचा मुख्य उद्देश हा सोव्हिएत युनियनच्या वाढत्या व्याप्तीला मर्यादा घालणे हा होता. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा शेवट झाल्यामुळे ‘वॉर्सा पॅक्ट’ नष्ट झाला. तर मग आता ‘नाटो’ ची गरज काय?...
परतवाडयाचे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली जुळी शहरे होत. परतवाडयात आधी लष्करी छावणी होती. त्यानंतर कालांतराने तेथे गाव वसले. त्या परतवाडयाच्या वकील लाईन या परिसरात शहरातील सर्वात जुने अशी ओळख असलेले श्री विठ्ठल मंदिर आहे.
भोपाळच्या सुधारणावादी दोन बेगम (Sikandar Begam – Bhopal’s Reformist Ruler)
भोपाळच्या गादीवर महिला १८१८ पासून शंभर वर्षे राज्य करत होत्या. त्यांनी कल्याणकारी राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्यात सिकंदर बेगम व सुलतान जहाँ बेगम यांनी लष्कर सेवा, प्रशासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात केलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरल्या…
‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर : व्यक्तिवेध
विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे...
बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)
महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...
आधुनिक हिरकणी – लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर
डॉ. माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल या भूदलातील दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर नियुक्ती २०२० मध्ये झाली. त्या समकक्ष पदावर जाणारी पहिली मराठी स्त्री हा बहुमान त्यांना लाभला. त्यांना २६ जानेवारी २०२२ रोजी परम विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवण्यात आले. त्या निवृत्तीनंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत...
अचलपूर तालुका
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे...
सुंदरबाई पवार – ब्रिटिशांच्या अफू धोरणाविरूद्ध लढा
ब्रिटिशांच्या अफूधोरणाच्या विरूद्ध लढा सुंदरबाई एच पवार या एका हिंदू - ख्रिस्ती महिलेने दिला. ब्रिटिशांनी अफूच्या व्यापाराला भारतात उत्तेजन देण्याचे जे धोरण स्वीकारले होते त्या विरूद्ध सुंदरबाईंनी खुद्द इंग्लंडात जाऊन तब्बल एकशेसोळा भाषणे दिली होती !