Home Search

पुण्यात - search results

If you're not happy with the results, please do another search

स्त्री मुक्ती संघटना (Stree Mukti Sanghatana)

स्त्री मुक्ती संघटना गेली 48 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून संघटनेने विविध स्तरातील स्त्रियांच्या आयुष्यात गुणात्मक फरक केला आहे. पंचवीस वर्षे स्त्री मुक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष आणि 2018 पासून त्या संघटनेच्या सेक्रेटरी असलेल्या अमोल केरकर या लेखात स्त्री मुक्ती संघटनेच्या उद्दिष्टांविषयी आणि वाटचालीविषयी विस्ताराने सांगत आहेत. संस्थेच्या 48 वर्षांच्या कामाविषयी असल्यामुळे लेख काहीसा दीर्घ आहे. मात्र संस्थेच्या वाढीसाठी केलेले विविध उपक्रम या लेखामुळे इतर संस्थांनाही मार्गदर्शक ठरतील असे आहेत. अमोल केरकर यांना बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीत काम करण्याचाही दीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या मृदू स्वभावाच्या आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्तीचे अनुभव आणि विचार महत्त्वाचे आहेत...

अन्नपूर्णा परिवार

महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांच्या नावांमध्ये ‘अन्नपूर्णा परिवारा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ही संस्था गरीब आणि गरजू महिलांच्या सक्षमीकरणाविषयी समग्र विचार करते. व्यवसाय, आरोग्य, कुटुंबाचा विकास, आरोग्य, निवृत्तीवेतन अशा अनेक आघाड्यांवर भक्कमपणे महिलांच्या पाठीशी उभी रहाणारी संस्था अशी अन्नपूर्णा परिवाराची ओळख आहे. आजमितीला सव्वा लाख शेअर होल्डर्स, बचत करणाऱ्या महिला आणि तीनशे पन्नास कर्मचारी वर्ग असलेल्या या संस्थेची माहिती सांगत आहेत पत्रकार आणि लेखिका वृषाली मगदूम...

मंगल मैत्री : एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या जन्माची गोष्ट

1
विख्यात गणितज्ज्ञ डॉ. मंगल जयंत नारळीकर यांचे 17 जुलै 2023 रोजी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या माहितीची नोंद व्हावी या उद्देशाने डॉ. शुभा थत्ते यांच्यासह डॉ. मंगला नारळीकर यांच्या सहा मैत्रिणींनी त्यांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. ‘मंगलमैत्री’ नावाचे हे पुस्तक डॉ. शुभा थत्ते यांनी संपादित केले आहे. त्या या लेखात पुस्तकाच्या जन्माविषयी सांगत आहेत. जेणेकरून वाचकांना डॉ. मंगला नारळीकर यांचा परिचय होईल आणि पुस्तक वाचावेसे वाटेल...

कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...

सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...

पैठणीचे गाव- येवला (Yeola)

महाराष्ट्रातील अनेक गावांना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. तेथे विशेष उद्योग व्यवसाय आहेत. या गावांच्या अंतरंगात शिरले की त्यांच्या भरजरी पोताची जाणीव होते. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातले – येवला. ते महाराष्ट्रातीलच नाही तर देश-विदेशातील महिलांच्या जिव्हाळ्याचे गाव. स्वातंत्र्य चळवळीत या गावाचा महत्त्वाचा सहभाग होता. माधव सावरगावकर हे प्रथितयश लेखक मुळचे येवल्याचे. त्यांनी त्यांच्या गावाचा इतिहास आणि वर्तमान जिव्हाळ्याने या लेखात सांगितला आहे...

टीच – माणसे घडवणाऱ्या व्यवस्थेचा दिशादर्शक (TEACH Tool for School Inspection)

वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातच कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे. या साधनामुळे शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एक समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे...

द.ब. पारसनीस या इतिहासकाराचा जन्म ! (How the historian named D B Parasnis was...

हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये जी लोकोत्तर स्त्रीरत्ने प्रकाशमान झाली त्या सर्वांमध्ये शेवटचे व शौर्यगुणामध्ये अग्रेसर असे स्त्रीरत्न म्हणजे झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब होत. पारसनीस यांनी झाशीच्या राणीसंबंधीची बारीकसारीक माहिती सोन्याच्या खाणीत काम करणारा माणूस क्षणोक्षणी, कणाकणाने सोने टिपतो तशी गोळा केली. ती प्रचंड कष्टाने जमवलेली माहिती त्यांनी कल्पकतेने लिहून काढली. त्या बाबतीत पारसनीस यांना प्रतिभेची भरभरून अशी देणगी मिळाली होती...

नाना फडणीस : स्वराज्याचा शेवटचा वीर (Nana Phadnis’s contribution to Peshawa Raj)

0
नाना फडणीस यांनी त्यांच्या असामान्य बुद्धिचार्तुयाने, कर्तृत्वाने आणि अपार कष्टांनी स्वराज्याचे रक्षण करण्याचे, ते टिकवण्याचे आणि वाढवण्याचेही कार्य मराठ्यांच्या इतिहासात केले आहे. त्यांची ख्याती निष्ठावंत प्रशासक आणि कर्तबगार स्वराज्यसेवक अशी आहे...

सद्भावना संमेलन

काळ दुर्गतीला सोकावलेला असताना आपल्यासारखी सुखासीन संवेदनाशील माणसे एकवटली त्यामधून सत्शक्तीची चळवळ उभी राहिली तर ! म्हणून हे सद्भावनेचे संमेलन. संमेलनातून सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर प्रभाव टाकणारा काही कृतिकार्यक्रम आखला जावा अशी उमेद मनाशी आहे...