Home Search
पुणे - search results
If you're not happy with the results, please do another search
बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज
बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे...
अभिजात दर्जा मिळाला… आता पुढे काय?
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले होते. 2004 मधील निकष 2005 मध्ये सुधारित करण्यात आले. ते चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी तमिळ (2004) आणि संस्कृत (2005) भाषेला असा दर्जा मिळाला.
त्यानंतर तेलुगु (2008), कन्नड (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे निकष 2024 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर दोनशे-तीनशे कोटी रुपये वगैरे मिळणार नाहीत. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प आखावे लागतील तेव्हाच काही कोटी रूपये मिळू शकतील. त्यासाठी अभ्यासकांनी विचार करण्यास हवा...
मराठी – अभिजात भाषा !
भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर तिचा विकास-संवर्धन-अभिवृद्धी यासाठी राज्य सरकारला दरवर्षी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळते. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी अभिजाततेचा दावा केंद्र सरकारकडे (2012-2013) करून, अटी सिद्ध करण्याचे काम केले. ते काम साहित्यिक-संशोधकांच्या एका अभ्यास समितीने पूर्ण केले. मराठी भाषेने 2013 साली केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अकरा वर्षांनी मराठीला तो दर्जा प्राप्त झाला आहे. मराठीसोबत अजून चार भाषांना तो दर्जा त्याच दिवशी मिळाला. मग मराठी ही देशातील सातवी अभिजात भाषा की अकरावी? भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या बावीस भाषांपैकी अकरा म्हणजे अर्ध्या भाषा आता अभिजात ठरल्या आहेत...
लेणी कोंडाण्याची (Cave Sculpture of Kondana)
कोंडाणे लेणी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात त्याच नावाच्या गावात आहेत. बोरघाटातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट अरण्य आहे. मोठे वृक्ष, महाकाय वेली आणि जंगली श्वापदे यांचा वावर तेथे असतो. त्यात वृक्षवेलींच्या-झाडझाडोऱ्यांच्या गुंत्यात लपल्या होत्या कोंडाणे लेण्यांच्या अप्रतिम शिल्पकृती. लेणी इसवी सनापूर्वी पहिल्या-दुसऱ्या शतकांत साकारण्यात आली. परंतु ती लेणी किर्र रान, मुसळधार पाऊस आणि भूकंप यांनी झालेली पडझड यांमुळे ओसाड होऊन गेली आणि विस्मृतीच्या पडद्याआड सारली गेली...
रामानंद तीर्थ आता संकेतस्थळावर ! (Website for Ramanand Tirth’s Birth Centenary)
रामानंद तीर्थ यांच्यावरील संकेत स्थळाची निर्मिती हा व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या ‘महाभूषण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग आहे. किबहुना, त्या प्रकल्पाचा प्रारंभही या संकेतस्थळाने होत आहे. त्यांच्या जन्मदिवशी, 3 ऑक्टोबर 2024 ला व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने तयार केलेल्या स्वामीजींवरील संकेतस्थळाचे प्रकाशन अंबाजोगाई येथे होत आहे. सोहळा ‘स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळ’ येथे होणार आहे. हा कार्यक्रम शिक्षणतज्ज्ञ आणि स्वामीजींच्या चरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. संकेतस्थळ गिरीश घाटे यांनी तयार केले आहे. ते हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक आहेत...
नीतिन वैद्य यांनी रचलेला त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा विचारकोश (T V Sardeshmukh’s world of...
सोलापूरचे नीतिन वैद्य यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक, ‘त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्य- संदर्भ साहित्य : सूची आणि चरित्रपट’ हे पुस्तक व दोन, ‘जवळिकीची सरोवरे’ हे पुस्तक. यांपैकी पहिले पुस्तक सूची वाङ्मयाचे आहे. त्यात सूचिकाराने स्वतः प्रास्ताविक जोडलेले आहे. त्यातून, सूचिकाराने सरदेशमुख यांच्या साहित्याचा शोध कसा घेतला, त्यास कोठे कोठे हिंडावे-फिरावे लागले, आर्जवे-मिनतवाऱ्या कराव्या लागल्या या शोधाची मन पिळवटून टाकणारी कहाणी आहे. त्याने स्वतःच्या शारीरिक मर्यादांची तमा न बाळगता केलेली ती धडपड थक्क करणारी आहे ...
पद्मश्री प्रेमा पुरव – स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारी महिला
2 जुलैची सकाळ. उदास उदास. धड पाऊस नाही, धड ऊन नाही. मेधाताईचा उठल्यावर एसएमएस पाहिला, ‘आई गेली रात्री’. आई म्हणजे प्रेमाताई पुरव आणि मेधाताई म्हणजे त्यांची मुलगी मेधा पुरव-सामंत. पद्मश्री प्रेमा पुरव यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले. प्रेमा तेंडुलकर, गोवा मुक्तीसंग्रामातील क्रांतिकारक, सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘अन्नपूर्णा महिला मंडळ, मुंबई’च्या संस्थापक. ताई ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’, ‘महागाई प्रतिकार समिती’, ‘साने गुरुजी व्याख्यानमाला’ अशा संस्थांमधून घडत गेल्या...
संतनगरी आकोट (Akot- City of Saints from Vidarbha)
आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. त्या दोघांमध्ये स्नेहबंध घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे...
गोरक्ष ट्रेकिंग: प्रस्तरारोहकांचे आकर्षण
गोरक्ष किल्ला हा दोन हजार एकशेसदतीस फूट उंचीचा असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. तो ठाणे जिल्ह्याच्या कर्जत डोंगररांगेत मोडतो. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. गोरक्ष किल्ला हा मुंबईकरांना आणि पुणेकरांना एका दिवसात करता येण्याजोगा आहे. गोरक्ष आणि मच्छिंद्रगड यांना ऐतिहासिक वारसा नाही तरी त्यांच्या सुळक्यांचे प्रस्तरारोहकांना मात्र आकर्षण वाटते. त्या गडाला महत्त्व शहाजी राजांच्या काळात होते; मात्र तेथे लढाई झाल्याचा उल्लेख नाही. गडाचा उपयोग शिवकालात आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे...
आरंभकाळातील पोस्टरविचार
भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’ हा 1931 साली निर्माण झाला. त्या आधी मूकपट 1913 पासून प्रदर्शित होऊ लागले होते. पहिल्या बोलपटानंतर, 1934 पर्यंत पुढीलप्रमाणे चित्रपट निर्माण झाल्याची नोंद आढळते. ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ (1932); ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’ (1933); ‘अमृतमंथन’ (1934) येथपर्यंतच्या चित्रपटांची पोस्टर्स जरी उपलब्ध असली तरी त्या चित्रकृती कोणाच्या त्यांचा नामोल्लेख नाही. आरंभ काळातील चित्रपट आणि त्यांचे पोस्टर कलाकार - या कलावंतांचा कार्यकाल 1924 ते 1941 असा आहे. सुबोध गुरुजी यांनी त्या कलाकार मंडळींची चरित्रे व कार्य अशा स्वरूपातील माहिती संकलित केली आहे...