Home Search

आदिवासी - search results

If you're not happy with the results, please do another search

पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !

गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...

पारधी मुलांच्या शिक्षणासाठी संकल्प ! (Residential Hostel for Nomadic Tribal Children)

2
राशीन गावचा तरुण विजय भोसले आदिवासी पारधी समाज विकास संस्थेच्या वतीने ‘संकल्प वसतिगृह’ चालवत आहे. त्यास आठ-नऊ वर्षे झाली. तो प्रकल्प अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात येतो. कर्जत तालुका व त्याला लागून असलेले बीड-नगर जिल्ह्यांतील प्रदेश दुष्काळी व मागास आहेत. त्या प्रदेशांत फासेपारधी, भिल्ल, भटके, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार यांची संख्या बरीच आहे. त्याने श्रीगोंदा येथे बी एड केले. मात्र त्याने शिक्षकाची नोकरी स्वीकारली नाही...

आली गवराई अंगणी…

गवर म्हणजे गौरीची झाडे आणि फुले. ही फुले फार तर तीन दिवस टिकतात श्रावणातील सगळ्या पूजा, मंगळागौर आणि भराडी गौर सजवताना ‘गौरीची’ फुले आवर्जून वापरली जातात. एकेरी, डबल, तिब्बल पण पातळ पाकळ्यांची अक्षरशः अनंत रंगांतील ही फुले, कोणत्याही पूजेच्या सजावटीत मोठी खुलून दिसतात. इथून तिथून कोणत्याही गौरीला तेरडा असेही म्हणतात. गौरीच्या झाडाचे आयुष्य फार तर महिनाभर आणि फुलांचे तीनच दिवस. तिच्या अल्पायू व्यक्तिमत्त्वामुळे ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ असल्या म्हणी जन्माला आल्या. हिंदी आणि उर्दूत तिला ‘गुलमेहंदी’ म्हणतात, कारण त्या फुलांपासून लाल केशरी रंग तयार करता येतात...

ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)

ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...

शिक्षण पत्रिका नव्वदी पार !

शिक्षण पत्रिका’ हे मासिक गेली नव्वद वर्षे अविरतपणे सुरू आहे. या मासिकाचे स्थान बालशिक्षणक्षेत्रात फार मोलाचे आहे. ताराबाई मोडक यांनी ‘मराठी शिक्षण पत्रिके’ची सुरुवात अमरावती येथे 1932 साली केली. मासिक 1933 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यापूर्वी ‘शिक्षण पत्रिका’ गुजराती भाषेत प्रसिद्ध होत असे. पुढे ती हिंदी भाषेतही प्रसिद्ध होऊ लागली. ताराबाईंनी ‘शिक्षण पत्रिके’चे संपादन 1933 ते 1955 असे दीर्घकाळ केले. ‘शिक्षण पत्रिके’ने महाराष्ट्राला व भारतातील अनेक शहरांना बालशिक्षण या नव्या संकल्पनेची ओळख करून दिली...

बकुळफुलांचा अक्षयगंध… अक्षयरंग… (Blossoming Bakul)

बकुळीचे झाड हे मूळचे भारतीय उपखंडातील झाड आहे. त्याच्या फुलांचा सुगंध मोहक आहे आणि रूप मनोवेधक आहे. हे झाड औषधी वनस्पतीही आहे. पूर्ण वाढलेले बकुळीचे झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या त्या झाडाखाली दाट सावली असते. बकुळीच्या फुलांचे वेड सर्वांना, विशेषत: मुलींना असते. त्या फुले गोळा करत बकुळीच्या झाडाखाली तासचे तास रमू शकतात. या बहुगुणी झाडाविषयी मंजूषा देशपांडे त्यांच्या आठवणी आणि अनुभव सांगत आहेत...

बालशिक्षणातील अनुताईंचे प्रयोग ! (Anutai Wagh : Pioneering Efforts in Child Education)

अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहकारी. त्यांनी कोसबाडच्या आदिवासी भागातील बालशिक्षणाचे- ताराबाई मोडक यांचे कार्य जोमाने पुढे नेले. त्या कार्याला अनेक पदर जोडले. अनुताई यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. त्यांना मातृत्व तर सोडाच; पण विवाहितेचे सौभाग्यही क्षणिक लाभले ! मात्र अनुताईंनी आदिवासींच्या व दलितांच्या मुलांना वात्सल्याने स्वत:च्या कवेत घेतले. त्या समाजातील मुलांचे खरे शिक्षण ‘त्यांना माणसात आणण्याचे’ होते. ती मुले केवळ शिक्षणापासून वंचित नव्हती, तर त्यांचे शिक्षणाशी जणू शत्रुत्व तयार झाले होते. त्यांनी तशा मुलांच्या गळी शिक्षण उतरवण्याचा लोकविलक्षण खटाटोप केला...

पाऊस पहावा‌ (Enjoying Rains)

पावसाळा हा सृजनाचा, आनंदाचा ऋतू. प्रत्येक माणसाच्या मनात पावसाच्या काही खास आठवणी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या पावसाळ्यातल्या भटकंतीच्या, धबधब्यांच्या, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या, हिरवाईच्या आणि क्वचित निसर्गाच्या कोपाला एकत्र येऊन तोंड देण्याच्याही. जसजसा काळ जातो तसतशा या आठवणी अधिक गहिऱ्या होत जातात. भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागात पावसाची अशी एक खास परिभाषा, पावसाविषयी ठोकताळे आहेत. ते जाणून घेण्यात मजा आहे. सध्या पावसाने संततधार धरली आहे. अशा या बाहेरच्या पावसाविषयीचा डॉ. मंजूषा देशपांडे यांचा ललित लेख ज्याच्यात्याच्या मनातल्या पावसाच्या आठवणी हमखास जाग्या करेल...

अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

किल्ल्यांचे तीन मुख्य प्रकार गिरीदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग असे असतात. भुईदुर्ग म्हणजे अर्थातच जमिनीवरचा किल्ला किंवा भुईकोट. महाराष्ट्रात भुईदुर्गांचे प्रमाण कमी आहे. अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे. इतकेच नाही तर वेगळ्या कारणांसाठी वापरात आहे. त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किल्ला मुघल, पेशवाई आणि ब्रिटिश काळात तुरुंग म्हणून वापरात होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे ‘हाय प्रोफाईल्ड’ राजकीय कैदी त्या तुरुंगात बंदी होते. त्याच तुरुंगात नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा महत्त्वाचा बृहद्ग्रंथ लिहिला...

लिंगा गावचे अवधुत पंथी स्तंभ !

लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे...