Home Search

श्रीकृष्ण - search results

If you're not happy with the results, please do another search

लिंगा गावचे अवधुत पंथी स्तंभ !

लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे...

मधुमालतीचे दिवस (Madhumalati Days)

‘मधुमालती’ हे काव्य चतुर्भुजदास या कवीचे, अवधी भाषेत लिहिलेले मध्ययुगातले काव्य. कलेतिहासाच्या अभ्यासक डॉ. मंजिरी ठाकूर यांच्या हाती या काव्याचे हस्तलिखित लागले ज्यात दोनशेहून अधिक राजस्थानी शैलीतील लघुचित्रे होती. या काव्याचा आणि चित्रांचा अभ्यास करताना एकातून एक उलगडत जाणाऱ्या कथा, उपकथा, जोडकथांचे एक मनोहर जोडकाम असणाऱ्या खास भारतीय कथनशैलीपर्यंत आणि त्यायोगे पंचतंत्रापर्यंत त्या येऊन पोचल्या. ‘मधुमालती’ या काव्याविषयी, भारतीय कथनशैलीविषयी आणि पंचतंत्राच्या जगद्व्यापी प्रवासाविषयी आजच्या लेखात खास शैलीत लिहित आहेत डॉ. मंजिरी ठाकूर...

रुक्मिणी स्वयंवर (Rukmini Swayamvar)

1
मध्ययुगीन मराठी साहित्यात रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा वारंवार लिहिली गेली. आद्य मराठी कवयित्री महदाइसा उर्फ महदंबा हिने ‘मातकी रुक्मिणी स्वयंवर’ हे आख्यानकाव्य लिहिले आहे. रामदेवराय यादवाने त्याच्या पदरी असलेल्या कवी नरेन्द्राकडे, त्याने लिहिलेले ‘रुक्मिणी स्वयंवर’ त्याच्या नावावर करावे म्हणून आग्रह धरला मात्र नरेन्द्र व-हाड प्रांतात निघून गेला अशी आख्यायिका आहे. नंतरच्या काळात लिहिलेले आणि आजही लोकप्रिय असलेले रुक्मिणी स्वयंवर म्हणजे संत एकनाथांचे ‘रुक्मिणी स्वयंवर’...

आगोम : निरामय सूक्ष्म औषधांचा वसा (Story of ‘Agom’ medicines)

0
ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने. ‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे...

सोळा संस्कार विधी (Hindu Code of Sixteen Rituals for Human Life)

संस्कार हे भारतीय संस्कृतीतील आचारधर्माचे वैशिष्ट्य मानले जाते. आचारधर्म म्हणजे आचरणाचे, वर्तनाचे, वागण्या-बोलण्याचे नीतिनियम. सोळा संस्कार हे मानवी आयुष्याशी आणि माणसाने जपावयाच्या मूल्यांशी निगडित आहेत. गर्भधारणेपासून ते अंतेष्टीपर्यंत म्हणजे मृत्यूवेळेपर्यंत व्यक्तीवर आईवडील, गुरू आणि पुरोहित यांच्याकडून विधी केले जावे असे गृहित आहे. त्यांना संस्कार असे म्हटले जाते...

फलटणचे दीडशे वर्षांचे वाचनालय (Phaltan public library celebrates 150 years of its foundation)

फलटण संस्थानामध्ये एकोणिसाव्या शतकात वाचनालयाची स्थापना झाली. ती कामगिरी संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांची. तेव्हा तिला ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे म्हटले गेले. स्थापना दिन आहे 9 ऑगस्ट 1870. म्हणजे लायब्ररीला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. तालुका पातळीवरील वाचनालय हे त्या काळी अप्रूप होते. मुधोजीराजांनी दोन हजारांपेक्षा अधिक ग्रंथ वाचनालयात संग्रहित केले. ते जुने ग्रंथ हे त्या वाचनालयाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते ग्रंथ जतन करण्यात आले आहेत...

महानुभाव पंथीयांचे पूजनीय अचलपूर

अचलपूर तालुका हा महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यांच्या पवित्र जागा तालुक्यात अनेक आहेत- अष्टमहासिद्धी, वडनेर भुजंग, असदपूर, काकडा, अचलपूर शहरातील रत्नपूजा, निर्वाणेश्वर, बोरबन, पिंगळभैरव, लाखबन, देव्हार चौकी, अंबीनाथ, सोमनाथ ही ती श्रद्धास्थाने. महानुभावांना स्थान म्हणजे परमेश्वर अवताराच्या स्पर्श सबंधाने पवित्र झालेले ठिकाण. एकूण अकरा प्रकार स्थानासबंधी आहेत...

दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी

1
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...

इंजिनीयर विजय गोळे – ‘केल्याने प्रवास-पर्यटन मनुजा चातुर्य येतसे फार’

इंजिनीयर विजय गोळे नोकरीउद्योगाच्या निमित्ताने देशभर फिरले, पण अखेरीस स्वगावी, दापोलीला येऊन स्थिरावले. त्यांना परदेशी जायचेच नव्हते, त्यामुळे तो मुद्दा त्यांच्या जीवनात पुढे आला नाही. त्यांचे मूळ गाव हर्णे, दापोलीपासून पंधरा किलोमीटरवर. तेथे त्यांचे दोनशे वर्षांपूर्वीचे जुने घर आहे...

वक्ता दशसहस्रेषु… प्राचार्य राम शेवाळकर

राम बाळकृष्ण ऊर्फ ‘राम शेवाळकर’. ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातकीर्त वक्ते, अध्ययन-अध्यापन-शैक्षणिक प्रशासन यांशी निगडित; तसेच, कला-साहित्य-संस्कृतीविषयक अशासकीय स्वायत्त विविध मंडळांचे सदस्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...