Home Search

लेखक - search results

If you're not happy with the results, please do another search
fro frame

एका निराशावादी लेखकाचं स्वगत

0
        एकविसाव्या शतकाच्या तिठ्यावर उभा राहून आज मी मागे-पुढे बघतो तेव्हा दुभंग दिसतो. माझ्यात आणि भवतालातही. नव्वदोत्तरी संवेदनशीलता नावाचा प्रकार साहित्यात...

ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...

वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...

कथा ग्लासफर्डपेठा गावाची (Story of Glasfardppeta)

4
भारत देशात अशी काही गावे आहेत जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावरून ओळखली जातात. त्या गावांशी निगडित कथा तितक्याच सुरस व रंजक आहेत. ‘ग्लासफर्ड’ हा मूळ स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ असा होतो. ते गाव प्राणहिता नदीच्या तीरावरील घनदाट जंगलात आहे. इंग्रजी सत्तेच्या काळात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून त्या गावास नवे नाव मिळाले. त्या अधिकाऱ्याचे पूर्ण नाव होते - चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन ग्लासफर्ड. त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ग्लासफर्डचे नाव विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृती यांच्या आद्य अभ्यासकांमध्ये घेतले जाते...

कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...

6
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...

मनमाड आणि गुप्तसर साहिब गुरुद्वारा

महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते...

बेलासीस रोड

स्थानिक इतिहास ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची शाखा आहे. मुंबईच्या इतिहासाचा विविध अंगांनी अभ्यास करणारी काही पुस्तके इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये गेल्या दहा वर्षांत आली आहेत. तरुण अभ्यासक पुढे येत आहेत. अनेक मनोरंजक कथा समोर आल्या आहेत. ‘मोगरा फुलला’ या दालनात वेगवेगळे लेखक ‘ये है मुंबई मेरी जान’ या सदरामध्ये मुंबईविषयी लेख लिहितील. यांतील पहिला लेख नितीन साळुंखे यांचा...

नवा मानुष वाद

एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...

एकोणपन्नासावे साहित्य संमेलन (Forty-Nine Marathi Literary Meet 1973)

यवतमाळ येथे 1973 साली झालेल्या एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘गीतरामायण’कार ग.दि. (गजानन दिगंबर) माडगूळकर ऊर्फ गदिमा. ‘गदिमा’ हे केवळ ‘गीतरामायण’ एवढे अप्रतिम काव्य लिहून साहित्यविश्वात अजरामर झाले असते. ते प्रासादिक, प्रतिभाशाली आणि प्रसन्न असे गीतकार होते. त्यांच्या गीतरचनेला कवितांचा दर्जा लाभला. त्यांच्या पटकथा-संवादांनीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः चमत्कार केला !माडगूळकर हे कोठल्याही मैफिलीचा ताबा घेत असत...

नवरात्रीतील देवीचे महात्म्य

नवरात्रीतील देवीचे महात्म्य भक्तिभावाच्या अंगाने फारच वाढले असले तरी गावोगावची देवळे प्रसिद्ध आहेत, ती तेथील प्रथापरंपरांमुळे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अशी सांस्कृतिक माहिती आपण संकलित करत असतो. यांपैकी कोणत्याही लेखाबाबत वाचकांकडे जादा माहिती असेल किंवा कोणत्या नव्या देवस्थानावर सांस्कृतिक महत्त्वाच्या अंगाने लेखन करण्याची इच्छा असेल; तर info@thinkmaharashtra.com या इमेल पत्त्यावर लिहावे वा ‘थिंक महाराष्ट्र’च्या नंबरवर फोन (9892611767) करावा...

मोगरा फुलला

मराठी साहित्यविश्वातील कवयित्री व भाषा अभ्यासक सुनंदा भोसेकर आणि आघाडीच्या ललित लेखिका राणी दुर्वे या दोघी ‘मोगरा फुलला’ या नावाचे नवे दालन घेऊन थिंक...