Home Search

पुराणे - search results

If you're not happy with the results, please do another search

अश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण !

0
भारतीय लोकांना अठरा पुराणे ठाऊक आहेत. त्या अठरांत कूर्म आणि वराह या नावांची प्राण्यांना उद्देशून दोन पुराणे आहेत. ते विष्णूचे अवतार. मात्र घोडा हा माणसाचा जुन्यातील पाळीव प्राणी आणि त्याचे महत्त्व असूनदेखील त्याच्या नावाने एखादे पुराण नाही कारण विष्णूने अश्वावतार घेतला नव्हता ! मात्र अश्वपरीक्षा नावाचे एक जुने पुस्तक वाचण्यास मिळाले आणि पुराणाची उणीव भरून निघाली. घोड्याला संस्कृतीत यथायोग्य स्थान मिळाले अशी भावना झाली. त्या ‘अश्वपुराणा’ची ओळख करून घेण्यापूर्वी त्या ग्रंथाच्या संग्राहकाची ओळख करून घेण्यास हवी. पुस्तक संकलित केले आहे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी...

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

वाल्मिकीचे पठार – पानेरी

वाल्मिकी पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पठारावर वाल्मिकी ऋषींनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. तेथील वाल्मिकी मंदिर पूर्वाभिमुख असून, वाल्मिकींची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या भागाचे आणखी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वन्य जीवांचा अधिवास असलेले घनदाट जंगल…

गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी ! (Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice)

गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...

निळोबारायांची अभंगार्तता

0
ज्ञानदेवांनी जी भक्ती कल्पना मांडली, संत नामदेवांनी ज्या भक्तीचा प्रसार पंढरी ते पंजाबपर्यंत केला, तुकोबांनी ज्या भक्तीचे गोडवे गायले; निळोबांनी त्याच भक्तीचा प्रसार पुढे, दोन शतकांनंतर केला. देव आणि भक्त एक होऊनही भक्तीच्या सुखासाठी वेगवेगळे राहतात ही अद्वैतातील भक्तीची त्यांची कल्पना. त्या भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते असा साऱ्या संतांचा अनुभव आहे...

चौतिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fourth Marathi Literary Meet – 1951)

चौतिसावे मराठी साहित्य संमेलन कर्नाटकात कारवार येथे 1951 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष अनंत काकबा प्रियोळकर हे होते. त्यांची ख्याती चिकित्सक संशोधक, प्राचीन वाङ्मयाचे विचक्षण अभ्यासक, दुर्मीळ ग्रंथांचे साक्षेपी संपादक अशी होती. ते भाषाशास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. पाठचिकित्सा शास्त्रातील सखोल संशोधन हा त्यांचा विशेष प्रांत...

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! लेखावरील विचारचर्चा (Debate on Yeshu’s Myth for spread...

1
येशूख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! हा लेख 'थिंक महाराष्ट्र'वर 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला. तो अनेकांनी वाचला. त्या लेखाखाली; तसेच इमेलवर वाचकांनी प्रतिक्रियादेखील नोंदवल्या. तो लेख बहुचर्चित ठरेल अशी अपेक्षा होतीच.

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! (Wanted Yeshu’s Myth for spread of Christianity in...

इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा तुलसीदास वाचतात तेव्हा ते म्हणतात, की हा इतिहास नव्हे, कल्पित आहे ! बरोबरच आहे ते. तो इतिहास नाहीच आहे. कल्पितच आहे ते. तरीसुद्धा तुलसीदास हा कवी संत लूक याने ख्रिस्ताला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा अधिक न्याय श्रीरामाला देतो...

नववे साहित्य संमेलन (Marathi Literature Meet 1915)

नववे साहित्य संमेलन 1915 साली मुंबई येथे मिरज संस्थानचे संस्थानिक श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. गंगाधरराव पटवर्धन हे तसे पाहिले तर साहित्यिक नव्हते.

रायरंद आणि बहुरूपी यांची सोंगे (Folk Art of Rairand And Bahuroopi)

रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारा लोककलावंत. रायरंद, रायरंद्र, रार्इंदर हे शब्द मराठी भाषेतील रायविनोदी म्हणजे विदूषक, बहुरूपी, खुशमस्कऱ्या या अर्थाने वापरले जातात...