30 POSTS
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्या राहणा-या. त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्या ‘वनवासी कल्याणाश्रम‘ या संस्थेत काम करू लागल्या. ईशान्य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्यांच्यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन गेला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्येची‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.