Home Search
भाषां - search results
If you're not happy with the results, please do another search
भारतवाणी – एकशेवीस भारतीय भाषांचा एक उद्गार! (Bharatwani)
‘भारतवाणी’ ही सर्व म्हणजे एकशेवीस भारतीय भाषांना तिच्या कवेत सामावून घेणारी महत्त्वाकांक्षी व दीर्घ काळ चालणारी योजना आहे. म्हैसूरच्या ‘भारतीय भाषा संस्थे’ची ती योजना आहे. ज्ञान दृक्श्राव्य, पाठ्य, मुद्रण, छाया अशा विविध माध्यमांद्वारा उपलब्ध करणे,
भाषांतर मासिक (Bhashantar Masik)
राजवाडे यांनी ‘भाषांतर’ मासिकाचा पहिला अंक जानेवारी १८९४ मध्ये प्रसिद्ध केला. राष्ट्राचा स्वाभिमान वाढीस लावण्यासाठी व जगातील निरनिराळे विचारप्रवाह देशबांधवांना सांगण्याच्या हेतूने उत्तमोत्तम, विचारप्रवर्तक...
महाराष्ट्राच्या बेचाळीस भाषांचे लोकसर्वेक्षण
गणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ ‘महाराष्ट्र’ या खंडात जवळपास बेचाळीस भाषा सर्वेक्षक व चर्चक यांचे प्रयत्न समाविष्ट आहेत. त्यांचे विभाग संपादक अरुण जाखडे...
सिंधी व मराठी या भाषांची तुलना
सिंधी भाषा ही मुसलमानी रियासतीत खेडवळ लोकांची भाषा म्हणून मानत. शहरातील सुशिक्षित सिंधी व उर्दू – फार्सीच्या संस्काराने, मिश्र झालेली भाषा बोलत. तो राजकीय...
जगातील भाषांवर संस्कृतचा प्रभाव
युरोपात सर्वत्र पसरलेल्या जिप्सींच्या रोमा बोलीभाषा हिंदीच्या प्राथमिक अवस्थेतून निघाली आहेत, याची अनेक उदाहरणे देता येतील. रोमा भाषेत काही मराठी, गुजराती, पंजाबी शब्द आहेत....
विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !
महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...
माझी पुंजी : मला भेटलेली माणसे !
पद्मिनी दिवेकर शिकागोच्या नेपरव्हिल नावाच्या उपनगरात गेली सत्तावीस वर्षे राहत आहे. त्या नवरा सतीश आणि मुलगी गार्गी भारतातून अमेरिकेला गेले. त्या भारतात ‘कोशीश स्कूल फॉर द डेफ’ ह्या मालाड येथील बहिऱ्या मुलांच्या शाळेत शिक्षिका 1987 ते 1993 पर्यंत होत्या. त्या अमेरिकेत गेल्यानंतर तेथील प्रिस्कूलमध्ये आणि नंतर हायस्कूलमध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून नोकरी काही वर्षे करू लागल्या. त्यांना पुन्हा स्पेशल एज्युकेशन शिक्षिका व्हावेसे वाटत होते. त्यांनी अमेरिकेत स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या विषयातील असिस्टंट म्हणून इलिनॉईस राज्याच्या अर्ली इंटरव्हेन्शन अंतर्गत काम करतात. त्यांच्या घरापासून पंचवीस मैलांच्या परिघात शून्य ते तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांना घरी जाऊन स्पीच थेरपी देतात. त्या हे काम पंधरासोळा वर्षे करत आहे...
राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)
कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती...
बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज
बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे...
अभिजात दर्जा मिळाला… आता पुढे काय?
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले होते. 2004 मधील निकष 2005 मध्ये सुधारित करण्यात आले. ते चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी तमिळ (2004) आणि संस्कृत (2005) भाषेला असा दर्जा मिळाला.
त्यानंतर तेलुगु (2008), कन्नड (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे निकष 2024 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर दोनशे-तीनशे कोटी रुपये वगैरे मिळणार नाहीत. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प आखावे लागतील तेव्हाच काही कोटी रूपये मिळू शकतील. त्यासाठी अभ्यासकांनी विचार करण्यास हवा...