Home Search
पुण्यात - search results
If you're not happy with the results, please do another search
वृद्धांसाठी पुण्यात आभाळमाया (Abhalmaya For Elders in Pune)
वृद्धांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, वृद्धाश्रम आहेत. वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. डॉक्टर होऊन भौतिक माया वाढवण्यापेक्षा मायेने निराधार वृद्ध लोकांचा सांभाळ करावासा वाटणाऱ्या माणसांची विचारांची घडण अनन्यसाधारण असते. डॉ.अपर्णा देशमुख यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ‘आभाळमाया’ नावाचा वृद्धाश्रम सुरू केला...
पुण्यातील बाटल्यांचा बंगला
राजेंद्र इनामदार लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. मग त्यांनी त्या पोत्यात भरून गोळा करण्यास सुरुवात केली. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !
संजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र (Sanjay Nahar)
संजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात...
आर्यन चित्रमंदिर – पुण्यातील पहिले चित्रपटगृह
'आर्यन चित्रमंदिर' हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते....
परित्राणाय पुण्यात
पुण्यातील तरुणांना घेऊन डॉ. सतीश राजमाचीकर काही उपक्रम राबवत असतात. त्यांचा आरंभ झाला तीन-चार वर्षांपूर्वी. राजमाचीकर यांनी सामाजिक भान असलेले लघुपट पुण्याच्या...
वेदपाठशाळांची आजही गरज (Schools for studies of Vedas are necessary)
देशातील वेदांचे अध्ययन आणि अध्यापन यांची परंपरा ही ऋषी-मुनी आणि वैदिक यांनी जोपासली. त्यासाठी गुरुकुल पद्धतीच योग्य आहे. वेदांचे सूत्र आहे. त्याच पद्धतीने वेदांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे. पुण्याच्या वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी असे मत मांडले आहे. त्यांनी महाराष्ट्रात ऐंशी पाठशाळा तर गोव्यात पाचसहा पाठशाळा कार्यरत आहेत. देशभरात सुमारे चार हजार वेदपाठशाळा सुरू आहेत असा अंदाज सांगितला आहे.
वसंत जोशीचा मृत्यू – जो आवडे सर्वांना… (Vasant Joshi, Yogic Man Liked by All)
वसंत जोशी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शांतपणे झोपेत मरण पावला. तो त्या आधी चार दिवस थोडा अस्वस्थ होता. तसे तर, त्याने त्याचे सार्वजनिक कार्य वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी थांबवले होते. वयोमानाने शरीर थकत होते. त्याच्या पत्नीचे, सुनीताचे देहावसान त्या आधी, तीन वर्षांपूर्वी झाले. त्या काळात, त्याला काही व्याधींनी घेरले, विस्मृती जाणवू लागली होती, पण गंभीर असे काही नव्हते. त्यात सोसायटी पुनर्विकासानंतर मिळालेला फ्लॅट मोठा; अपत्याविना जीवन एकाकी होते. त्याचे पुतणे रविंद्र जोशी व सूनबाई अश्विनी यांनी त्याच्या नाश्ता-जेवणाची व्यवस्था केली होती. पुतणी ज्योती पानसे जाऊन-येऊन लक्ष ठेवायची. तो स्वतः उठून शनिवार, रविवार पुतण्या व पुतणीकडे जाई. वसंतचा स्वभाव ‘सोशल’; सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा, हसतमुख राहण्याचा होता. त्याने जीवनाबद्दल तक्रार कधीही, अगदी शेवटच्या काळातही केली नाही. परंतु घरात तो एकटा असे. सोसायटीतील काही परिवारांचा त्याला आधार होता...
एस.एम. जोशी यांच्या नावे संकेतस्थळ (VMF’s website released to cover S M Joshi’s life...
प्रख्यात समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या नावाचे संकेतस्थळ ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि गिरीश घाटे यांनी ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’साठी पुण्यामध्ये एका बैठकीत खुले केले. त्यामुळे एस.एम. जोशी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचारकार्य जगभरच्या लोकांना एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. एस.एम. यांचे संकेतस्थळ हा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘महाभूषण’ प्रकल्पाचा एक भाग आहे. यापूर्वी साने गुरूजी आणि रामानंद तीर्थ यांची संकेतस्थळे तयार केली आहेत. अनेक संकेतस्थळे निर्माण करून ती सार्वजनिक रीत्या लोकांना दृश्यमान होतील अशी सायबरस्पेसमध्ये ठेवण्याचा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चा संकल्प आहे...
विलास शिंदे यांची हाक, निसर्गासाठी ! (Vilas Shinde’s Efforts for Environment)
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे हे शैक्षणिक पात्रतेनुसार व्हायचे मातब्बर प्राध्यापक; परंतु वास्तवात ते शिरले विद्यापीठ प्रशासनात आणि झाले कुलसचिव. अर्थात, त्याआधी उप, प्रभारी अशी कुलसचिवपदे त्यांना निभावावी लागलीच. एका अर्थाने तेही बरे झाले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठास उत्तम, अनुभवी प्रशासक लाभला, विद्यापीठाच्या टेकडीवर निसर्गसृष्टी बहरली, विद्यापीठ हे पाण्याने मालेमाल झाले; तेवढेच नव्हे तर संकटसमयी विद्यापीठ साऱ्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवू लागले ! विलास शिंदे यांच्यात एकाच वेळी शिक्षणप्रेमी प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, हाडाचा निसर्गवेडा आणि लेखनकुशल विज्ञानप्रसारक अशी चार व्यक्तिमत्त्वे लपली आहेत. मात्र लोकांच्या लेखी ते ‘पाणीवाला बाबा’ किंवा इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या कविमनाच्या व्यक्तीस ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असतात...
विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !
महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...