Home Search
कलाकृती - search results
If you're not happy with the results, please do another search
करवंटीपासून कलाकृती – सुनील मोरे यांचे कसब
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा येथील सुनील मोरे या उपक्रमशील शिक्षकाने त्याच्या हस्तकौशल्यातून नारळाच्या टाकाऊ भागातून एकापेक्षा एक असे सुंदर कलाविष्कार घडवले आहेत. मोरे यांनी तयार...
हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल ! – परिचर्चा
जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...
नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय
नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...
ए.एच. मुल्लर यांचा चित्रवारसा सांगलीत
चित्रकार आर्चिबाल्ड हर्मन मुल्लर यांचा जन्म केरळमधील कोचीन शहरामध्ये झाला. त्यांची मातृभाषा मल्याळी असली तरी त्यांना इंग्रजी व हिंदी या भाषा उत्तम येत होत्या. मुल्लर यांना चित्रकलेची आवड होती. ते पाहिलेल्या व्यक्तीचे अथवा वस्तू घटकाचे हुबेहूब चित्रण करत असत. त्यांनी स्वतःचे स्थान 1910 ते 1922 या बारा वर्षांच्या काळात मुंबईच्या कलाजगतात निर्माण केले. त्या काळी चित्रकला क्षेत्र हे थेटपणे व पूर्णपणे व्यावसायिक नव्हते. मुल्लर यांच्या ‘राजकन्येचे ब्राह्मण भिक्षुक मुलास दान’ या चित्राला ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे ‘सुवर्णपदक’ 1911 साली मिळाले...
सांगली कला/वस्तू संग्रहालयात उत्तम चित्रकृती (Sangli Art Museum)
महाराष्ट्रात तेरा शासकीय कला/वस्तू संग्रहालये आहेत. ती शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामध्ये एकट्या कोल्हापुरात दोन संग्रहालये आहेत. बाकी गावे अशी - नागपूर, औरंगाबाद, सिंदखेडराजा, तेर, पैठण, नाशिक, माहूरगड, सातारा, औंध, सांगली, रत्नागिरी. त्याशिवाय खासगी संग्रहालये व संग्राहक यांची संख्या ही वेगळीच आहे. वस्तू संग्रहालयांतील कलावस्तू या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा, सांस्कृतिक बहुविधतेचा आणि कलासंपन्न जीवनशैलीचा वारसा सांगत असतात. त्यामुळे संग्रहालये जपली जाणे- त्यांचे संवर्धन होणे हे महत्त्वाचे होय. त्यासाठी त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे...
खिद्रापूरचा कोपेश्वर – छोटे खजुराहो !
कोल्हापूरनजीकच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे श्रद्धा व शिल्पकला यांचे उत्तम मिश्रण आहे. तेथील प्राचीन वैभव सुस्थितीत आढळते. शिलाहारांनी अनेक देवळे बांधली, त्यांतील अंबरनाथ, पेल्हार, वाळकेश्वर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक आहे खिद्रापूरचे शिवमंदिर. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्यशास्त्र अशा बहुविषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात आहेत...
आनंदप्रवासी रवींद्र पिंगे
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...
आरंभकाळातील पोस्टरविचार
भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’ हा 1931 साली निर्माण झाला. त्या आधी मूकपट 1913 पासून प्रदर्शित होऊ लागले होते. पहिल्या बोलपटानंतर, 1934 पर्यंत पुढीलप्रमाणे चित्रपट निर्माण झाल्याची नोंद आढळते. ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ (1932); ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’ (1933); ‘अमृतमंथन’ (1934) येथपर्यंतच्या चित्रपटांची पोस्टर्स जरी उपलब्ध असली तरी त्या चित्रकृती कोणाच्या त्यांचा नामोल्लेख नाही. आरंभ काळातील चित्रपट आणि त्यांचे पोस्टर कलाकार - या कलावंतांचा कार्यकाल 1924 ते 1941 असा आहे. सुबोध गुरुजी यांनी त्या कलाकार मंडळींची चरित्रे व कार्य अशा स्वरूपातील माहिती संकलित केली आहे...
मेघदूत: आषाढस्य प्रथम दिवसे… (Meghdut- First day of the month of Ashadh)
आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाला सुजाण भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान आहे. आश्चर्य म्हणजे हे स्थान कोणत्या एखाद्या सणामुळे किंवा घटनेमुळे नाही तर एका खंडकाव्यातील ओळीमुळे आहे. कविकुलगुरू कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्याच्या दुसऱ्या श्लोकात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा शब्दसमूह येतो. ‘मेघदूत’ या काव्याने अनेकांना भुरळ घातली आहे. बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या युरोपिय भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली आहेत. मराठीतच किमान सहा भाषांतरे उपलब्ध आहेत. अशा या अद्वितीय खंडकाव्याचा परिचय गीता जोशी रसिकतेने आणि मर्मग्राही दृष्टीने करून देत आहेत...
भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)
भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...