कवी कालिदास

0
29

कालिदास हा शकारी विक्रमादित्याच्या पदरी असलेल्या नवरत्नांपैकी एक होता असे मानले जाते. पण डॉ. भांडारकर, मिराशी इत्यादी पंडितांच्या मते कालिदास हा गुप्त घराण्यातील द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या आश्रयाला होता. विक्रमादित्याने इसवी सन ३८० ते ४१३ या कालखंडात राज्य केले. म्हणून कालिदास चौथ्या शतकाच्या शेवटी व पाचव्या शतकाच्या आरंभी झाला असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

त्याच्या नैसर्गिक प्रतिभेला शास्त्राभ्यासाची, कला-परिचयाची व सूक्ष्म अवलोकनाची जोड मिळाली होती. त्याची वृत्ती शृंगाररसात रमत असे. त्याने अनेक ठिकाणी उत्तम गृहस्थाश्रम व एकनिष्ठ पत्निप्रेम यांचाही गौरव केला आहे. त्याचा स्वभाव विनोदी, विनयसंपन्न, निरलस आणि वत्सल असावा. त्याचे एकूण आयुष्य थोर लोकांच्या सहवासात आणि संपन्न अवस्थेत गेले. त्याची प्रतिभा सर्वार्थाने अनुकूल वातावरणात खुलत गेली. भावकवी, महाकवी, श्रेष्ठ नाटककार ही त्यांची ओळख. ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य, ‘मेघदूत’ हे खंडकाव्य, ‘कुमारसंभव’ व ‘रघुवंश’ ही दोन महाकाव्ये आणि ‘मालविका मित्र’, शाकुंतल ही त्याची नाटके रसिकांच्या मन:पटलावर विराजमान झालेली आहेत.

(भारतीय संस्कृति कोशातून उद्धृत)

About Post Author