तिसरे साहित्य संमेलन -1905
तिसरे साहित्य संमेलन सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ते दुसऱ्या संमेलनानंतर तब्बल वीस वर्षांनी भरले होते. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या नावावर ग्रंथकार म्हणावे अशी ग्रंथसंपदा नव्हती. त्यांची फार मोठी साहित्यसेवाही नव्हती, तरीही ते तिसऱ्या साहित्य संमेलनाचे (म्हणजे ग्रंथकार संमेलनाचे) अध्यक्ष झाले. कारण ज्यावर्षी ते साहित्य संमेलन भरले त्याच वर्षी नवकवितेचा प्रणेता आणि श्रेष्ठ कवी म्हणून ज्यांचे नाव वाङ्मयेतिहासात नोंदले गेले त्या केशवसुतांचे निधन झाले. वास्तविक तो मान केशवसुत यांच्यासारख्या श्रेष्ठ कवीला मृत्यूपूर्वी मिळण्यास हवा होता.